Get insurance amount for losses in 2021-22 – demand of Nemale farmers
नेमळे गावातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 20 21-22 च्या रब्बी हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानाची विमा रक्कम( आंबा काजू )तातडीने मिळावी तसेच नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी महसूल मंडळात समाविष्ट करावे या मागणीसाठी नेमळे गावातील विमाधारक शेतकऱ्यांनी सावंतवाडी चे तहसीलदार यांना बुधवारी निवेदन दिले .नायब तहसीलदार महेंद्र मुसळे यांनी हे निवेदन स्वीकारले. दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही लक्ष वेधणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले सन 2021 -22 च्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री फळपीक विमा( आंबा ,काजू )मध्ये सहभागी नेमळे गावातील शेतकऱ्यांना पर्जन्यमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली. मात्र ,या हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली नाही.
नेमळे / प्रतिनिधी