ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे जवळपास मागील वर्षभरापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे गैरहजर असल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता ही सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.
अधिक वाचा : कॉपी करू न दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर दगडफेक; शिक्षक जखमी
राज्यात 23 महापालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समितीच्या निवडणुका व्हायच्या आहेत. महाविकास आघाडी सरकारची वॉर्डरचना न्यायालयाने ग्राह्य धरल्यास निवडणूक प्रक्रिया लगेचच सुरू होऊ शकते.