वारणानगर / प्रतिनिधी
गेली पाच दिवस पन्हाळा तालुक्यात सततधार पडत असलेल्या दमदार पाऊसाने शेतकरी सुखावला आहे.नद्याचे पाणी पात्रा बाहेर पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली असलीतरी गंभीर बनलेली नाही सततच्या पाऊसाने सार्वजनिक तसेच कच्ची घरे, गोठा यांची पडझड होऊन सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
जून मध्ये मौसमी पाऊसाला वेळीच सुरवात झाली नाही धूळ वाफेवर केलेली भाताची पेरणी व थोड्या फार प्रमाणात पडलेल्या पाऊसात केलेल्या नाचनी सोयाबीन भुईमूग इत्यादी खरीप पिंकाच्या पेरणीस पाऊसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभा राहिते होते
अगदी अंतीम टप्प्यात वेळीच पाऊसाला सुरवात झाल्याने पिकांना नव संजीवनी मिळाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
पन्हाळा तालुक्यात महसूलच्या मंडल निहाय पन्हाळा ५९.५, वाडी रत्नागिरी ५७.८, कोडोली ३४.५, कळे ७६.४,पडळ ५७.६, बाजार भोगाव ११४. ७,कोतोली ६८.७ मि. मी. पाऊस पडला असून पन्हाळा तालुक्यात आजपर्यन्त २५७ ते ५०० मि.मी. पाऊस झाला असून सरासरी तालुक्यात ६७ मि.मी. पाऊस पडलातरी कोडोली मंडल मध्ये सर्वाधिक कमी पाऊस पडला आहे. पन्हाळा,कळे,पडळ, कोतोली व बाजार भोगाव या मंडल मध्ये पाउसाचे प्रमाण जास्त आहे.
. वारणा, कुंभी नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली आहेत तसेच काही ठिकाणचे दळण वळण विस्कळीत झाले आहे नदीच्या पात्रा बाहेर पाणी वाढल्याने पूर स्थिती निर्माण झाली असलीतरी गंभीर नाही आपतकालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे कुंभी वारणा तसेच कळे या ठिकाणी यात्रीक बोटी देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तहसिलदार माधवी शिंदे, नायब तहसिलदार,पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर,पन्हाळा, कोडोली कळे पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी,यांच्या मार्गदर्शनाखाली पूरस्थिती होणाऱ्या गावातील
स्थलांतरण स्थलांतरितांना राहण्याची व्यवस्था शाळा ,मंदिरे यांना भेट दिली.गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या सर्व विभागांचे कर्मचारी भागात आहेत का याचा आढावा घेतला, महसूल प्रशासन, पंचायत समिती सर्व कर्मचारी अधिकारी, पोलीस भागात तळ ठोकून आहेत.नागरिकासाठी राहण्यास शाळा मंदीर अन्य पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.संबधीत सर्व मंडल अधिकारी,तलाठी, कोतवाल. पोलीस पोलीस पाटील, सरपंच ग्रामसेवक यांच्या माध्यमातून सतर्क यंत्रना कार्यान्वीत करण्या बरोबर ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
वारणा नदीवर असणारे वसंत सागर या चांदोली धरण क्षेत्रात आजवर ७९६ मि.मी . पाऊस पडला असून धरणात २४ टीएमसी पाणीसाठा होउन धरण ७० टक्के भरले आहे विद्युत निर्मीती साठी ९१६ क्युसेसने नदी पात्रात विसर्ग सुरु आहे.
सततधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे दळण वळण देखील कमी झाले आहे शेतमजूरी व अन्य कामे ठप्प आहेत तसेच जनावरांच्या चारा पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.