नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश ते केरळपर्यंत देशात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, तेलंगणासह 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दक्षिण आणि मध्य गुजरातमधील 6 जिल्हे सध्या पुराच्या विळख्यात अडकले आहेत. छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी आणि पंचमहालमध्ये पुरामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. नवसारी आणि वलसाड जिल्हय़ांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात पावसामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात मात्र अजूनही मान्सूनची प्रतिक्षा असून आणखी 3-4 दिवस किरकोळ पावसाचा अंदाज आहे.
गुजरातमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्मयताही हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या एनडीआरएफच्या 13 तुकडय़ा आणि एसडीआरएफच्या 16 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशात दमदार पावसामुळे विमानसेवा प्रभावित झाली आहे. नर्मदापूरम येथील तवा धरणाच्या पाणीपातळीत 3 फुटांनी वाढ झाली आहे. तसेच नर्मदेच्या पाणीपातळीतही दोन ते अडीच फुटांनी वाढ झाली आहे. विदिशामध्ये 24 तासांत 8 इंच पाऊस झाल्याने प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस छिंदवाडा येथील सौसरमध्ये झाला. येथे नऊ इंच इतका पाऊस बरसला. राजधानी भोपाळमधील दमट हवामानाचा परिणाम विमानांच्या उड्डाणांवर झाला. भोपाळला येणाऱया 3 विमानांचे ऐनवेळी इंदूरमध्ये लँडिंग करण्यात आले.
राजस्थानच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला. कोटा, बारण, झालावाड आणि बुंदी येथे मुसळधार पावसाने राज्यातील नद्यांना पूर आला आहे. चंबळमध्ये जास्त पाणी येत असल्याने धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. गेल्या 24 तासांत बुंदी, सीकर, धौलपूर आणि भिलवाडा जिह्यात दमदार पाऊस झाला.
केरळमधील चार जिल्हे, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड येथे येत्या 24 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे. तेलंगणाही सध्या रेड अलर्टवर आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱयांना आवश्यक पावले उचलण्याची सूचना केली आहे.