ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्ताने दरवर्षी शिवनेरीवरही शासकीय सोहळा असतो. याच कार्यक्रमादरम्यान व्हिआयपींसाठी शिवभक्तांची अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार आज घडला. त्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली.
संभाजीराजे म्हणाले, मी शिवनेरीवर जात असताना मला शिवभक्तांनी अडवले. व्हिआयपी पाससाठी आडवणूक होत असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यावेळी मीही शिवभक्तांना जो पर्यंत किल्ल्यावर प्रवेश मिळत नाही, तो पर्यंत किल्ल्यावर न जाण्याची भूमिका घेतली. व्हीआयपीं लोकांसाठी सर्वसामान्य शिवभक्तांना का अडवता, आम्ही किती दिवस हे सहन करणार?, सर्वांना दर्शनाचा अधिकार आहे, यासाठी दुजाभाव नको.
अधिक वाचा : चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शासकिय कार्यक्रम 10 पर्यंत करा. तोपर्यं लोकांना गडावर सोडू नका. पण त्यांना इथे आणायचे आणि लोकांना दर्शन घेऊ द्यायचे नाही हे चालणार नाही. यापुढे हे सहन करणार नाही.