ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीकं मातीमोल होत आहेत. शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतो. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता 10 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य नेते उपस्थित होते. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे 10 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. या निर्णायासह अनेक महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.
सुधारित रेती धोरणास मान्यता देण्यात आली आहे. रेती लिलाव बंद करण्यात आले आहेत. ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार आहे. महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी, सेलर इन्स्टीटय़ूट सागर भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण करणे, नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता, देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल, अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निर्माण करणार, असे महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.
अधिक वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची जामिनावर सुटका; कोर्टाने ठोठावला 1.22 लाख डॉलर्सचा दंड