जिल्हय़ाचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांची अधिकाऱयांना सूचना : टप्प्याटप्प्याने विविध शासकीय योजनांची कामे वेळेत पूर्ण करा
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. 15 जूनपासून या योजनेला तातडीने प्रारंभ करावा. चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यामध्ये व दुसऱया टप्प्यामध्ये या योजनेची संपूर्ण कामे पूर्ण झाली पाहिजेत. तिसऱया टप्प्याचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कामाला लागावे, अशी सूचना सरकारचे अप्पर मुख्य सचिव, ग्रामीण विकास आणि पंचायतराज विभाग, बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी केली आहे.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये त्यांनी अधिकाऱयांना ही सूचना केली आहे. जलजीवन मिशन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम योग्य प्रकारे झाले नाही. यामुळे वेग मंदावला आहे. त्यासाठी त्याचा वेग वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसऱया टप्प्यात हाती घेण्यात येणाऱया योजनेचा आराखडा तयार केला पाहिजे. कोणत्याही योजनेत त्रुटी राहता कामा नये. डिसेंबरअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
चिकोडी विभागामध्ये 666 कामांपैकी 652 कामे जून 15 पर्यंत पूर्ण होतील, असे चिकोडी विभागाचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते बनगार यांनी सांगितले. योजनेचा डीपीआर तयार करताना तांत्रिक अडचणी बारकाईने समजून घेणे महत्त्वाचे आहे. पहिल्या व दुसऱया टप्प्यात झालेल्या चुकांची पुनरुक्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
पाणी संरक्षण योजना
पिण्याच्या पाण्याची टंचाई असणाऱया तालुक्मयांबद्दल माहिती घेऊन तेथे पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची खबरदारी घ्या. पाणी कमी असेल तर कूपनलिका किंवा आवश्यकता भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करावा, असे त्यांनी सांगितले. सलग 5 ते 10 वर्षे पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये नरेगा योजनेंतर्गत पाणी संरक्षण योजना राबवावी. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
घरोघरी जाऊन लस द्या
पोलिओ व इतर लसीकरण हे वेळेत पूर्ण झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेपर्यंत लसीकरणाची मोहीम पोहोचली पाहिजे. 60 वर्षांवरील सर्वांना प्रत्यक्ष घरी जाऊन लस देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा संघ, संस्थांची मदत घेऊन वाहनांची सोयदेखील करा, असे त्यांनी स्पष्ट केले. कुपोषित विद्यार्थ्यांना किंवा महिलांना गोळय़ांचे वितरण योग्य प्रकारे झाले पाहिजे. त्यांना वेळेत त्या गोळय़ा पोहोचवा, असेदेखील अतिक यांनी सांगितले.
शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करा
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. ज्या शाळांच्या इमारती खराब झाल्या आहेत त्याची तातडीने दुरुस्ती करावी. वेळेत गणवेश व पाठय़पुस्तकांचे वितरण करावे. शाळेत प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व दाखले वेळेत द्यावेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीच्या क्षेत्रामध्ये एक मैदान असणे आवश्यक असून त्यासाठी युवजन सेवा खात्याला सूचनादेखील त्यांनी यावेळी केल्या आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करा
प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक इमारती खराब झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तेव्हा तातडीने त्या आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करा, असे जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच समुदाय आरोग्य केंद्र, महिला व बाल कल्याण खात्यामधील सर्व समस्या सोडवून आरोग्य व्यवस्था सुरळीत करा, असे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले. यावेळी प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, संतोष कामगौडा, शशिधर बगली, जिल्हा पंचायत उपसचिव व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
औषधांचा साठा करा
पूर आल्यास औषधांच्या साठय़ांची गरज आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱयांनी आतापासूनच पाठपुरावा करावा आणि औषधांचा साठा करून ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी सरकारी दवाखाने, प्राथमिक आणि समुदाय आरोग्य केंद्रात मोफत औषध वितरणासाठी अनुदानाची गरज आहे. तेंव्हा अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर लसीकरण मोहीम राबविताना वाहनांची गरज असते. ती वाहनेदेखील उपलब्ध करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.