प्रतिनिधी / बेळगाव : वीरशैव लिंगायत समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे लिंगायत समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव महासभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या समाजामध्ये आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळणे कठीण झाले. त्यामुळे हा समाज देखील दुर्लक्षित राहिला आहे, तेव्हा तातडीने ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
महसूल अधिकारी एस एम परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, राज्य उपाध्यक्ष रुद्रांना बसकेरी, सुजित मुळगुंद, माजी अध्यक्ष विश्वनाथ पाटील, अॅड. बाबू यत्नट्टी, राजू टोपन्नावर, चंद्रशेखर बेंबळगी, चंदन हीडदुग्गी, अॅड. एम डी जिरली, अॅड. आर बी पाटील, यांच्यासह समाजातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.