सिलेत (बांगलादेश) : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 9 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील शेफाली वर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारताने या विजया बरोबरच मालिकेतही विजयी आघाडी मिळविली आहे.
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश 20 षटकात 8 बाद 117 (दिलारा अख्तर 39, निगर सुलताना 28, मोसेप्री 15, रितू मोनी 8, अवांतर 9, राधा यादव 2-22, रेणुका सिंग, वस्त्रकर आणि श्रेयांका पाटील प्रत्येकी 1 बळी), भारत 18.3 षटकात 3 बाद 121 (स्मृती मानधना 47, शेफाली वर्मा 51, हेमलता 9, कौर नाबाद 6, घोष नाबाद 8, नाहीदा अख्तर, रबिया खान, रितू मोनी प्रत्येकी 1 बळी).