2026 ते 2027 पर्यंत निर्यातीचे उद्दिष्ट
नवी दिल्ली
भारताची संयुक्त अरब अमिराती ( युएई) मधील निर्यात 2026-27 पर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, जी सध्या 31.3 अब्ज डॉलर्सची आहे. दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारामुळे ही वाढ अपेक्षित आहे, अशी माहिती वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिली आहे.
मागील वर्षी 1 मे रोजी व्यापार करार लागू झाल्यापासून भारत आणि युएई यांच्यातील व्यापारात लक्षणीय वाढ झाली आहे.
बर्थवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही आशा करतो की आम्ही 2026-27 पर्यंत 50 अब्ज डॉलरची निर्यात करू शकतो.
दोन्ही देशांनी केली स्वाक्षरी
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये युएईमध्ये भारताची निर्यात 11.8 टक्क्यांनी वाढून 31.3 अब्ज डॉलरची झाली आहे. या कालावधीत आयात 18.8 टक्क्यांनी वाढून 53.2 अब्ज डॉलरची झाली आहे. लेदर एक्सपोर्ट कौन्सिलचे माजी अध्यक्ष पी अकील अहमद म्हणाले की, हा अलीकडच्या काळातील सर्वात प्रभावशाली व्यापार करार आहे.