वाढीसोबत साखर 109.8 लाख टन झाली : अन्न मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सप्टेंबरमध्ये संपलेल्या मार्केटिंग वर्ष 2021-22 मध्ये भारताची साखर निर्यात 57 टक्क्यांनी वाढून 109.8 लाख टन झाली आहे. साखर व्यापारी वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालते. निर्यातीत वाढीमुळे सुमारे 40,000 कोटी रुपयांचे परकीय चलन देशात आले आहे. अन्न मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.
व्यापारी वर्ष 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर) अखेरीस शेतकऱयांची उसाची थकबाकी केवळ 6,000 कोटी रुपये होती. 1.18 लाख कोटी रुपयांच्या एकूण देय रकमेपैकी साखर कारखान्यांनी 1.12 लाख कोटी रुपयांची शेतकऱयांची देणी चुकवली आहेत. अन्न मंत्रालयाने सांगितले की, भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. चीनचा ग्राहक असण्यासोबतच, हा देश जगातील दुसऱया क्रमांकाचा निर्यातदार देश आहे.
देशात संपलेल्या आर्थिक वर्षात उसाचे उत्पादन विक्रमी 5000 लाख टनांच्या पुढे गेले आहे. त्यापैकी साखर कारखान्यांनी उसाचे गाळप करून सुमारे 3,574 लाख टन साखर आणि सुमारे 394 लाख टन साखरेचे उत्पादन केले. त्यातून इथेनॉल तयार करण्यासाठी 35 लाख टन साखर वापरली गेली आणि 359 लाख टन साखर कारखान्यांनी तयार केली.\