संतोष पाटील,कोल्हापूर
Kolhapur News : कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या व्यक्तीचरित्र दर्शवारे व्टेल्थफेल हे पुस्तक अमेजॉनवर तीन वर्षात सर्वोत्तम विक्रीचे ठरले. डॉ. शर्मा यांच्या या पुस्तकारवर अधारीत व्टेल्थफेल हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात जगभरात चार भाषांमध्ये रिलीज होत आहे.नामवंत दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर सोशलमिडीयार व्हायरल झाला अन् पहिल्या पाच तासांत पन्नास लाख लोकांनी तो बघितला.या चित्रपटातील अरे जबान बहोत चलती है तेरी… अरे जबान चलाना सुरू कहॉ की है.. मै चम्बल का हूँ समजा… हा डायलॉग तरुणाईवर गारुड घालत आहे.कोल्हापुरात पोस्टींग दरम्यान पेटलेलं टोल आंदोलन, उसदरवाढीचा लढा, काँम्रेड गोविंद पानसरे हत्या, मटका-जुगार बंदी आदी प्रकरणी झोकून देवून सेवा बजावलेल्या डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या रुपेरी पडद्यावरील जीवनपटाबाबत कोल्हापुरकरांत विशेष आकर्षण असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली,नागपूर,नांदेड,चंद्रपूर,कोल्हापूर,मुंबई आदी ठिकाणी आपल्या कार्याच्या न पुसण्राया पाऊलखुणा डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी मागे ठेवल्या आहेत. डॉ.शर्मा यांची कोल्हापुरातील कारकिर्द करवीकरकरांच्या कायमपणे ध्यानात राहिल अशीच आहे.टीपेला पोहचलेला टोल प्रश्न आणि ऊस दराचा भडका या धगधगत्या आंदोलनांनी डॉ.शर्मा यांचे कोल्हापुरात स्वागत केले.टोल आंदोलनातील एक किस्सा हे एक उदाहरण आहे.कोल्हापुरातील कळंबा येथील टोल नाका हटविण्यासाठी ज्येष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील आग्रही होते. डॉ.एन.डी.पाटील यांनी त्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु केले.एन.डी.यांना आंदोलनातून माघार घेण्यासाठी ठोस कार्यपूर्ती करणारेच आश्वासन देण्याची गरज होती. टोल ही न्यायिक बाब बनली होती तर दुस्रया बाजूला जनभावना टोकाची तिव्र होती.अशा स्थितीत एन.डी.पाटील यांचा सामना कोण करणार? यामुळे ही जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अधिक्रायांनी त्यावेळी अक्षरश: पळ काढला.कोल्हापुरात केव्हाही उद्रेक होईल,अशी स्थिती निर्माण झाली.मात्र,डॉ.शर्मा यांनी शहराचे स्वस्थ बिघडू नये, यासाठी पोलीस 48 तासात कळंबा येथील टोल नाके काढतील,असे आश्वासन एन.डी.पाटील यांना दिले.त्यानंतर पुढील 24 तास कायद्याचा किस पाडत,पोलसांना अतिक्रमण हटविण्याचे असलेल्या अधिकाराचा वापर करीत डॉ.शर्मा यांनी कळंब्यातील टोल नाके जमिनदोस्त केले.त्यानंतर एन.डी.पाटील यांच्या घरी अनेकवेळा जावून डॉ.शर्मा यांनी टोलबाबत वस्तूस्थिती सांगितली.पोलीस प्रशासनावर एन.डी.पाटील यांचा विश्वास वाढल्याने त्यानंतरच्या काळात टोल आंदोलन टिपेला पोहचले, मात्र त्याची झळ सर्वसामान्यांना बसली नाही.
डॉ.शर्मा यांच्या काळात कोल्हापुरातून मटका आणि अवैधधंदे हद्दपार केले.कॉ. गोविंद पानसरे यांचे हत्याप्रकरण ही संवेदनशील स्थिती डॉ.शर्मा यांनी अत्यंत संयमाने हाताळली.डॉ शर्मा यांनी सलगपणे 22 तास राबत कसून तपास केला,योग्य दिशेन तपासाची सुत्रे जात असल्याचे पाहून कोल्हापूरकरांचा पोलीसांवर विश्वास दुणावला. 2014-15 च्या दरम्यान सोशल मिडीयातील एका व्हिडीओच्या निषेधार्थ कोल्हापुराती शिवाजी पुतळा येथे रात्री अकरा वाजता अचानक पाच हजारापेक्षा अधिक तरुण जमले. यातील काहींनी सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान केले.विशिष्ट समाजातील दुकाने फोडून लुटमार केली.
दरम्यान,विठंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दुस्रया दिवशी कोल्हापूर बंदचे आवाहन करण्यात आले.रात्री शहरात झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर बंद म्हणजे शहर पेटण्यास निमंत्रण ठरले असते.ती संपूर्ण रात्र डॉ. शर्मा यांनी बंद पुकारणारे नेते आणि प्रमुख कार्यकर्ते यांना गाठून आताची तोडफोड आणि उद्याचा बंदच्या मुळे होणारा संभाव्य दंगा याचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा दिर्घ परिणाम सांगितला.कार्यकर्त्यांचे मतपरिवर्तन करण्यात डॉ.शर्मा यशस्वी ठरले.बंद मागे घेण्यात आला.त्यानंतर सर्वधर्मियांनी एकत्र येत रॅली काढली.वर्गणी काढून पैसे गोळा करुन नुकसानग्रस्तांना दिले.
डॉ.शर्मा यांची रि?क्शन पूर्वीची ?क्शन ही त्यांची खासियत कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरली. डॉ. शर्मा यांच्याप्रमाणेच प्रामाणिकपणाचा वसा घेवून जनसेवा करणारे कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आणि शैलेश बलकवडे,महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, डॉ. कादंबरी बलकवडे,मल्लिनाथ कलशेट्टी असे अधिकारी हे प्रशासनासह संविधानावर जनमाणसांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी राबत आहेत.या अधिक्रायांच्या प्रामाणिक कार्यपध्दतीमुळेच लोकांचा प्रशासनावरील विश्वास कायम आहे.यापार्श्वभूमीवर डॉ.मनोजकुमार शर्मा यांच्या जीवनपट सांगण्राया व्टेल्थफेल या चित्रपटाची क्रेझ कोल्हापुरातही दिसून येत आहे.
सचिन तेंडूलकर ते मनोज वाजपेयींकडून कौतूक
व्टेल्थ फेल ही डॉ.मनोजकुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत प्रेरणादायक आणि रंजक कादंबरीवर नामवंतांनी जाहीर प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. कादंबरीचा नायक मनोज 12 वीमध्ये कॉपी करण्यात अपयशी ठरल्याने अपयशी ठरला आणि तिथूनच त्याच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होतो.वास्तविक घटना आणि पात्रांवर आधारित ही कादंबरी संघर्ष,प्रेम,अपयश आणि नागरी सेवांच्या कठीण परीक्षेच्या मार्गावरील यशाचा एक अस्सल कागदपत्रही आहे.‘हारा वही जो लढा नही‘ हे डॉ. शर्मा यांचे जीवनध्येय वाक्य आहे. तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे हे पुस्तक युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदतगार ठरेल, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर यांनी या पुस्तकाबाबत दिली आहे.‘संपर्क, समर्पण आणि अनुशासन यांचा मिलाफ‘ म्हणजे हे पुस्तक असल्याचे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले आहे.‘सफलता उन्ही के कंठ मे जयमाला पहनाती है,जीनमे साहस, स्विकार, संकल्प,और समर्पण समान अनुपात मे होते है यह उपन्यास इसी संतुलन की गाथा है‘,अशी प्रतिक्रिया अभिनेता अशुतोष राणा यांनी नोंदविली आहे.सुनिल गावस्कर म्हणतात, प्रख्यात फिल्म निर्देशक विशाल भारव्दाज म्हणतात,‘मेहनत, मोहब्बत और जुनून की एक नायाब दास्तांन है यह किताब‘.सुपर 30चे व्यवस्थापक आनंद कुमार यांनी ‘अगर दुनिया का सबसे निराश व्यक्ती भी इस पुस्तक को पढ लेता तो उसमे एक नई ऊर्जा का संचार हो जाएगा‘,असे गौरवोध्दगार काढले आहेत.‘अर्थिक मानसिक संघर्ष का विश्वनिय दस्तवेज‘ असल्याचे मनोज वाजपेयी म्हणतात.
अशक्य काहीच नाही
‘हारा वही जो लढा नही‘ हे माझ्या जीवनाचे ब्रिद वाक्य आहे.तरुणाईने कधीच अपयशाला खचू नये.जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर मी इथवर पोहचू शकत असेल तर तसा प्रयत्न करुन कोणीही पोहचू शकतो.“कौन कहता है आसमॉ में छेद नही होता,एक पत्थर तो दिल से उछालो यारो“ इतकंच तरुणाईला सांगेन.
आयपीएस डॉ. मनोजकुमार शर्मा