सरदार पटेल यांना लोहपुरुष का म्हंटले जाते –
लहान असताना पटेल यांच्या हातावर एक मोठा फोड आला होता. त्यामध्ये पाणी भरल तो फोडायचा कसा ? डॉक्टर म्हणाले याला तप्त सळईने फोडावं लागेल. डॉक्टर सुद्धा ते फोडण्यास कचरत होते. मात्र पटेलांनी डॉक्टरांच्या हातातली सळई घेतली तो फोड़ फोडला, ते रक्तबंबाळ झाले. पण सहन करण्याची ताकद सरदार पटेल यांच्याकडे होती. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता बघून इच्छाशक्ती जन्मजातच मिळाली होती.
जर सरदार पटेल नसते तर भारत देश कसा असता ?
काश्मीर ते कन्याकुमारी आणि आगरतला पासून अहमदाबादपर्यंत कित्येक वेळा प्रवास करावा लागला. ते केले नसेत तर अखंड राष्ट्र बनले नसते.
प्रत्येक राज्याचा एक प्रदेश असता. इंग्रजांनी जिथे जिथे भारताचे तुकडे केले तोच भारत जोडण्याचे काम पटेल यांनी करुन दाखवीले
सरदार पटेल यांचे वडील जावेदभाई पटेल हे 1857 च्या लढ्यातले स्वातंत्र्यसैनिक. हालाखीच्या परीस्थितीत पटेलांनी शिक्षण पूर्ण करून वकील झाले.
एकदा गांधींजी गुजराती लायन्स क्लबमध्ये आल्यावर ते म्हणाले की स्वच्छता आणि झाडू मारून देश स्वतंत्र होऊ शकत नाहि. परंतु नंतरच्या काळामध्ये चंपारण्याचा सत्याग्रह त्यांनी बघितला. गांधींची दोन वर्षानंतर अहमदाबाद येथे एका अधिवेशनात भेट झाली. तेव्हा “रीवोल्युशन ऑफ लॉयल्टी टू द ब्रिटिश किंग ” हे कागदपत्र गांधीजींनी फाडून टाकले. ज्यात लिहिलं होतं ब्रिटिश राज्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे हि शपथ घ्या. हे कागदपत्र फाडताना पटेल गांधींच्या व्यक्तिमlवाकडे प्रभावित झाले. वकिलीचा काळा कोट काढून जाळून टाकला. मातृभाषा बोलण्यास सुरुवात केली. खादीचा स्वीकार केला. ते म्हणाले, मी पैसे भरपूर कमवू शकतो. परंतु स्वातंत्र्याचे योगदान देऊ शकत नाहि. म्हणून त्यांनी वकिली व्यवसायाचा त्याग केला.
सरदार उपाधी –
त्यानंतर बरीच वर्षे गांधींच्या सानिध्यात राहून पटेलांनी गांधींना सहकार्य केले परंतु 1928 मध्ये गुजरात येथील बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व गांधींनी पटेलांना दिले. यामध्ये प्रभावीपणे कार्य केल्याबद्दल त्यांना सरदार हि उपाधी देखील देण्यात आली.
अध्यक्ष निवड –
1946 च्या काँग्रेस अधिवेशनात अध्यक्ष निवडायचा होता, 15 प्रांतीय समिती मधून 12 मते पटेलांना मिळाली. तेव्हा काँग्रेसचा अध्यक्ष होणारे पटेल देशाचे पहिले पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं होत. परंतु नेहरू नाराज झाले तर काँग्रेस सोडून जातील,काँग्रेसमध्ये फूट पडेल अशी भीती गांधींना वाटली, तेव्हा त्यानी पटेल यांना माघार घ्यायला सांगितले. पटेलांनी माघार घेतली अध्यक्ष पद सोडले. अखंड हिंदुस्तान निर्माण करण्यासाठी जयपुर, हैदराबाद, काश्मीर,जुनागड हि संस्थाने साम,दाम, दंड, भेद यांचा वापर करून भारतात जोडली गेली आणि एक राष्ट्र निर्माण झाले.
आज 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस देशांमध्ये एकता दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो