चंद्रयान-3 मिशनच्या यशानंतर आता इस्रोचा फोकस मानवी मिशन गगनयानवर आहे. या मिशनअंतर्गत एक स्पेसक्राफ्ट अंतराळात पाठवलं जाणार आहे, ते भारताच्या पहिल्या मानवी मिशनची रिहर्सल म्हणून पाठवलं जात आहे.
एका स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून महिला रोबोट व्योममित्रला स्पेसमध्ये पाठवण्याची तयारी केली जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितलं की, मानवी मिशनपूर्वी महिला रोबोटिक अंतराळवीर व्योममित्रला अंतराळात लाँच करणार आहे. एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. इस्रोचं महत्त्वाकांक्षी गगनयान मिशन ह्यूमन स्पेसफ्लाइटमध्ये भारताची क्षमता जगाला दाखवण्यासाठी सज्ज आहे.