शाहुवाडी प्रतिनिधी
स्पर्धात्मक युगात आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी शेती केल्याने ‘ इतर शेतकरी बांधवाच्यां समोर एक आदर्श निर्माण होतो .ज्या माध्यमातून अन्य शेतकरी बांधवही अधिक प्रेरणा घेतील असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी शाहूवाडी पंचायत समिती सभागृहात कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन या निमित्त शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील ‘पोद्दार एज्युकेशन सोसायटीचे संचालक पी डी पाटील ‘ कृषी विज्ञान केंद्र तळसंदे चे सुधीर सूर्यगंध ‘ सुरेश पाटील रंगराव खोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती .पुढे बोलताना बसवराज बिराजदार म्हणाले की शाहूवाडी च्या विभागामध्ये अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी ती नेहमीच आघाडीवर असतात .शेतीच्या उत्पन्नावर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना अधिक कसरत करावी लागत आहे . हे स्पर्धात्मक जग आहे आणि उत्पादकता कशा पद्धतीने वाढेल याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे
पोद्दार एज्युकेशन सोसायटीचे संचालक पी डी पाटील म्हणाले की भविष्याचा वेध घेऊन आपल्या शेतीमध्ये विविध पिकांच्या नियोजनबद्ध पद्धतीने लागवड केली पाहीजे .विविध औषधी वनस्पती त्याचबरोबर बाजारपेठेत अधिक मागणी असणाऱ्या पिकांची लागवड करून आपली शेती अधिक सुपीकता बनवता येते .यावेळी सुरेश पाटील सोंडोली . ‘माजी जिल्हा परिषद सर्जेराव पाटील ‘अमर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.मंडल कृषी अधिकारी शिवाजी काशीद यांनी प्रास्ताविक पर मनोगतात कृषी विभागाच्या वतीने राबवलेल्या विविध योजना त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विषयी माहिती दिली .
दरम्यान प्रारंभी पी डी पाटील यांचा सर्वोत्कृष्ट प्रयोगशील शेतकरी म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला . तर भात पीक स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले विनोद बेर्डे ‘तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेले चंद्रकांत पाटील टेकोली ‘ द्वितीय क्रमांक मिळवलेले तुकाराम बापू चौगुले निनाई परळे ‘ व तृतीय क्रमांक मिळवलेले संपत ज्ञानदेव पाटील कोतोली त्याचबरोबर गोबर गॅस योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल ग्रामसेवक गुरुप्रसाद कमलाकर ‘ जीवन कदम ‘अश्विनी भोसले यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
तर पंचायत समिती आवारात वृक्षारोपण देखील यावेळी करण्यात आले. याप्रसंगी रंगराव खोपडे ‘कृषी विस्ताराधिकारी अंकुश गोरे ‘संजय बिरंजे ‘ ग्राम विकास विस्ताराधिकारी अरुण बिडवे यांच्यासह कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी ‘ कर्मचारी ‘ ग्रामसेवक ‘ शेतकरी उपस्थित होते. कृषी विस्ताराधिकारी अंकुश गोरे यांनी सूत्रसंचालन केले.