ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
JEE Main 2020 आणि NEET 2020 या परीक्षेवर स्थगिती आणण्यासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी JEE Main आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केलेली मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. या परीक्षा यंदा वेळेतच होतील, असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये या दोन्ही परीक्षा होणार आहेत.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्थैर्य राखण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी पुनर्विचार याचिका झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांनी एकत्रितपणे दाखल केली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावल्यानंतर ही याचिका करण्यात आली आहे.