गारगोटी प्रतिनिधी
आम्ही फक्त टेस्ट रिपोर्ट मागणी केली पण यांना देण्यात भीती का वाटते मात्र ज्याने काही केले नाही त्यांना डर कशाला असा सवाल करून आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी आमच्यावर टीका करत आहेत असे म्हणत के पी साब को गुस्सा क्यों आता है असा टोला आमदार प्रकाश आबीटकर यांनी लगावला .
गारगोटी ता. भुदरगड येथे श्री दुधगंगा -वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर गट क्रमांक 5 च्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बा.r एस. देसाई होते. यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, जेष्ठ नेते मारूती जाधव गुरूजी उपस्थित होते.
आमदार आबीटकर म्हणाले की ,जेवढा नफा तेवढाच तोटा दाखवणारा बिद्री हा महाराष्ट्रातील पहिलाच कारखाना असून ऊस उत्पादकांची लुट करून संचालक मंडळ बेफिकीराचा कळस गाठत आहे. प्रबोधनाद्वारे लोकांना बिद्रीचा दर कसा कमी आहे याचे महत्त्व आम्ही पटवून देणार आहोत वास्तविक व विकासात्मक बाबीवरच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून एफआरपी पेक्षा पाचशे रुपये ऊस दर जादा देणार आहोत. ऊस उत्पादकानेही दोषी व भ्रष्टाचारी लोकांना थारा देऊ नये. ऊस उत्पादकांची धडधडीत लुट करीत असून शेतकऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी सज्ज राहावे .बिद्रीमध्ये परिवर्तन होणार असून सर्वांनी कामाला लागावे बिद्रीची सत्ता हस्तगत करून सर्वसामान्य उत्पादकाला न्याय देवूया.
ज्येष्ठ अभ्यासक मारूती जाधव गुरुजी म्हणाले की बिद्रीमध्ये सगळी लबाड गिरी असून जिह्यातील ब्रयाच कारखान्यांनी एफ आर पी पेक्षा जादा दर दिलेला आहे पण बिद्रीने केवळ 60 पैसे जादा दिलेले आहेत.आपण केलेले आरोप बरोबर आहेत त्यामुळे ऊस उत्पादकाने सत्ता बदलास साथ द्यावी यावेळी बिद्री चे माजी संचालक दत्तात्रय उगले, माजी सभापती बाबा नांदेकर, सुर्याजी देसाई यांची भाषणे झाले.
प्रास्ताविक बंडोपंत मोरे यांनी केले तर सुत्रसंचलन जितेंद्र निर्मळे यांनी केले आभार संग्राम सावंत यांनी मानले
यावेळी सुर्याजी देसाई, नंदकुमार ढेंगे ,के जी नांदेकर, दत्तात्रय उगले ,शिवसेना युवा प्रमुख विद्याधर परीट, शिवाजी ढेंगे, अशोक भांदीगरे, धैर्यशील भोसले, तात्या पाटील, जयवंत पाटील आदीसह ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते
बिद्री तुमच्या बापज्यादाची मालमत्ता नव्हे….
बिद्री साखर कारखाना काही तुमच्या बापज्यादाची मालमत्ता नव्हे सर्व सामान्य सभासदांच्या हितासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या ठेवी बिद्रीत ठेवल्या आहेत असा टोला बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले यांनी के पी यांचे नाव न घेता लगावला.
जनता मला आपटेल…
इरादा पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, के पी विधानसभा निवडणुकीत तुझ्याबरोबर फिरतील मात्र मी के पी बरोबर फिरल्यास जनता मला आपटेल असे आमदार आबीटकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे आबीटकर यांनी सांगितले. त्याला उपस्थित लोकांनीही त्याला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.