खानापूर प्रतिनिधी – खानापूर येथे 2006 साली झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम तसेच शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. खानापूर न्यायालयात त्याची सुनावनी गुरुवार 27 रोजी ठेवण्यात आली होती. त्यासाठी नितीन बानगुडे पाटील व रामदास कदम हे गुरुवारी सकाळी 11 वाजता खानापूर न्यायालयात हजर झाले होते. खानापूर न्यायालयाने 30 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. यावेळी कर्नाटक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पत्रकारांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला, त्यामुळे दोन्ही नेत्यांची पत्रकारांशी चर्चा होऊ शकली नाही.
Trending
- कसाबला बिर्याणी खाऊ घातल्याची अफवा उज्ज्वल निकम यांनीच पसरवली- शशी थरूर
- सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
- राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांच्या घेतल्या छत्रपतींनी भेटीगाठी
- ”पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब”; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान
- पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातून मताधिक्य देणार : आमदार विनय कोरे
- मुबलक पाणी, यंत्रमाग वीजदर सवलत ऑनलाईनची अट रद्द करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा : वैदांतिका माने यांचे आवाहन
- महायुतीच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद…वाठार ते शिरोली मोटर सायकल रॅली