विश्वनाथ मोरे / कसबा बीड
जून महिना सुरू झाला की पेरणीपासून खुकपणीपर्यंत शेतकऱ्याची लगबग सुरू होते. पिकाला आवश्यक असणारा पाऊस झाला की शेतकरी केलेल्या कष्टाचे चीज होते. यावर्षी महापूराची वाटत असताना अचानक 25 जुलैपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
पावसाने अचानक दडी मारल्याने कसबा बीड परिसरात शेतकऱ्यांसह शेतीपुरक व्यवसायिकांनी धास्ती घेतली आहे. पिक पेरणी नंतर उगवलेल्या पीकांना पाण्याअभावी खुप मोठा मार बसत आहे. आठ दिवस अजिबात पाऊस नसल्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन ही रब्बी पिकांच्या दुवार पेरणीचे संकट उभा राहण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे पावसाळी पीकासाठी घेतलेले कष्ट वाया जाते की काय ? या प्रश्नाने शेतकऱ्याचे आकाशाकडे डोळे लागले आहे.