राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत निर्धार; अशैक्षणिक कामाविरोधात केला जाणार एल्गार
कोल्हापूर प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे, शिक्षणाचे व नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महात्मा गांधी जयंतीदिवशीच (02ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी शिक्षक संघाने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदनही दिले असून शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. शिक्षक बँकेत झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्धार करण्यात आला.
सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे, ऑनलाईन माहित्या, वेगवेगळ्या प्रकारचे अॅप बंद करून शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम करून द्या, 30 नोव्हेंबर, 2005 नंतरचे सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, खाजगी कंपन्यांना जि.प.च्या शाळा चालवण्यास देण्यात येवू नये, नवीन शिक्षक भरती त्वरित करावी, तत्पूर्वी अंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली टप्पा राबविण्यात यावा, बाह्ययंत्रणे मार्फत कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी नेमण्याबाबतचा अध्यादेश रद्द करावा, आमदार प्रशांत बंब कडून शिक्षकाविषयी अवमान कारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, समूह शाळेचा झालेला निर्णय रद्द करावा, मुख्यालयी राहण्यासाठी अट शिथिल करण्यात यावी, कोल्हापूर जिह्यातील प्राथमिक शिक्षक व सेवा निवृत्त शिक्षक यांच्या थकीत वेतनासाठी, मेडिकल बिले, सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यांसाठी त्वरित अनुदान उपलब्ध करावे, प्राथमिक शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी, वस्तीशाळा शिक्षकांना शाळा स्थापनेपासून नोकरीत कायम करण्यात यावे, नवीन संचमान्यता त्वरित करण्यात यावी, त्यासाठी आधार सक्ती न करता संपूर्ण पटाप्रमाणे संचामान्यता शिक्षक भारतीपुर्वी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेत झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सुनिल पाटील, एन वाय पाटील, रघुनाथ खोत, विलास चौगले, आनंदराव जाधव सुनिल एडके, बाळासाहेब निंबाळकर, बाळकृष्ण हळदकर, एस.व्ही पाटील नंदकुमार वार्इंगडे,संभाजीराव पाटील, पद्मजा मेढे शिवाजीराव रोडे पाटील, अरुण चाळके ,विशाल प्रभावळे जयवंत पाटील व सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.