प्रतिनिधी, गगनबावडा
Kolhapur Rain News : गेले आठवडाभर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.यामुळे जनजिवन विस्कळित झाले आहे.भूस्खलन,दरडी कोसळण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रशासनाने राहती घरे सोडण्यास बजावले आहे.त्या आवाहनास प्रतिसाद देत कुपलेवाडी व पखालेवाडीतील 92 कुटुंबे आसऱ्यासाठी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्थलांतरीत झाली आहेत.विजेअभावी लहान मुले,महिला,व्रुद्धांना बाहेर नेताना अडचण येत आहे.
सोमवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारी रात्री दरड कोसळून इर्शाळवाडीतील कित्येक कुटुंबे गाडली गेली.या घटनेने राज्यभर भिती पसरली आहे.प्रशासनानेही यांची गंभीर दखल घेतली आहे.अतिव्रुष्ठीने धोका निर्माण होणारी कोल्हापूर जिल्ह्यातील 69 गावे निश्चित केली आहेत.कोनोली पैकी कुपलेवाडी व पखालेवाडी यांचा त्यात समावेश आहे.22 जूलै 2021च्या मध्यरात्री भूस्खलन होऊन दोन व्यक्ती व चार जनावरांचा बळी गेला होता.या घटनेमूळे हे गाव चर्चेत आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन व महसूल प्रशासनाने या गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे.गावच्या दक्षिणेकडील डोंगराला गेलेली भेग,घरांच्या मागील दृलदल यांची पाहणी केली.अतिव्रष्टीच्या काळात या घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.या काळात राहती घरे सोडण्याचे लेखी आवाहन सरपंच तसलिम पखाली,ग्रामसेवक टी.के मडवळ,तलाठी एस.एल.हजारे,पोलीस पाटील शिवाजी पाटील यांनी येथील कुटूंबाना केले होते.या आवाहनास प्रतिसाद देत या दोन गावातील 92 कुटूंबे गेल्या तीन दिवसांपासून रात्री आसऱ्यासाठी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्थलांतरीत झाली आहेत.
आठवडाभर वीज गायब
मुसळधार पावसाने राहत्या घरांना धोका आहे म्हणून ही गावे रात्रभर जागून काढत आहेत.समुहाने बसत आहेत.दि.17 जूलैपासून या परिसरातील वीज गायब झाली आहे.लहान मुले, महिला व व्रद्धांना अंधारातून घराबाहेर काढणे कठिण होत आहे. .गगनबावडा महावितरणने येथील वीज तात्काळ दुरुस्ती करावी.
दगडू कुपले,माजी सरपंच.कुपलेवाडी
गावचे पूनर्वसन करावे
दोन वर्षांपूर्वी येथे भूस्खलन झाले आहे.गावच्या दक्षिणेकडील डोंगरास भेग पडली आहे.मुसळधार पाऊस पडला की प्रशासन व ग्रामस्थांना या घटनेची आठवण होते.प्रशासनाने या गावचे पूनर्वसन करुन लोकांना संकटमुक करावे.
तसलिम पखाली, सरपंच , ग्रामपंचायत कोनोली