कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यामध्ये विशेष इंद्रधनुष 5.0 मोहिम अंतर्गत नागरी व ग्रामीण भागात एकही बालक तसेच गर्भवती महिला लसीकरणाचा पहिला टप्पा 7 ऑगस्टला सुरू होत आहे. या लसीकरणापासून कोणीही वंचित राहु नये, यासाठी आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे. नागरिकांनीही दक्ष राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
गोवर रुबेला आजार रोखण्यासाठी मिशन इंद्रधनुष मोहिम राबविण्यात येणार आहे. बालकामधील मृत्यु व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. त्यासाठी केंद्रशासनाने डिसेंबर 2023 पर्यत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी ऑगस्ट 2023 पासून 3 फेऱ्यांमध्ये जिह्याामध्ये विशेष इंद्रधनुष 5.0 कार्यक्रम हाती घेतला आहे. 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश असेल. त्यामुळे पहिला टप्पा 7 ते 12 ऑगस्ट 2023, दुसरा टप्पा 11 ते 16 सप्टेंबर 2023, तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोंबर 2023 असा असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.