कसबा बीड येथे कुंभी- कासारी साखर कारखाना निवडणूक नरके पॅनेल प्रचार शुभारंभ
कसबा बीड / विश्वनाथ मोरे
नरके पॅनेलवर सर्व सभासद व कामगार संघटना, शेतकरी यांची विश्वासार्हता आहे, असे कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी सांगितले . करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे कुंभी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रचार शुभारंभ महादेव मंदिर येथून करण्यात आला.त्यावेळी झालेल्या मेळाव्यात बोलत होते.
चंद्रदीप नरके म्हणाले, कै. डी. सी. नरके यांनी घालून दिलेल्या ध्येयधोरणानुसार पारदर्शक कारभार सुरू आहे.शेतकरी, सभासद वर्ग, कामगारांचा विकास ,व सहकाराने घालून दिलेल्या तत्त्वानुसार कुंभी कासारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे.चालू हंगामामध्ये 5 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे.को-जन व्यवस्थित चालू असून इथेनॉल निर्मितीचे काम फेब्रुवारी -मार्चमध्ये सुरू होईल.कारखान्यावर 300 कोटीचे कर्ज आहे , हे विरोधक सांगतात हे चुकीचे आहे.वार्षिक जनरल सभेमध्ये अहवाल वाचन करून कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे हे या अगोदरच सांगितले आहे. साखर दर घसरल्याने व साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची नाहक बदनामी केली जात आहे असा आरोप विरोधकांवर केला.सद्यस्थितीला कोणतीही देणी थकीत नसून फक्त एफआरपी साठी 35 कोटी कर्ज काढले आहे.126 कोटीची साखर शिल्लक आहे.साखर उद्योगांमध्ये कुंभी कासारी साखर कारखान्याने आज पर्यंत अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत.अत्यंत काटकसरीने व कर्तव्यतेने,नियोजनपूर्वक कार्यक्षमतेने कारखाना सुरू आहे.त्यामुळे सर्व सभासदांची विश्वासार्हता पारदर्शकता व सुरक्षितेसाठी सर्व सभासदांनी नरके पॅनेलला विजयी करावे असे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी आवाहन केले.
कुंभी बँकेचे चेअरमन व गोकुळचे संचालक अजित नरके यांनी 100 कोटीचा साडेसतरा मेगावॅट असणारा को-जन प्रकल्पतेरा महिन्यात पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चालू केला आहे.त्याचे व्याजासहित 108 कोटी परत केले आहे.यावर्षी एफ आर पी 3100 रुपये जाहीर करून जानेवारी महिन्यापर्यंतची बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. साखर उद्योगात अडचणीच्या काळामध्ये काटकसर करून चंद्रदीप नरके यांनी कारखाना चालवला आहे.खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने विरोधक कार्य करत आहेत,तरी सर्व सभासदांनी गेल्या 65 वर्षांमध्ये नरके पॅनलवरती जो विश्वास दाखवला आहे तो अबाधित ठेवावा व नरके पॅनेलला पूर्ण क्षमतेने निवडून द्यावे असे सांगितले.
यावेळी पी. डी. पाटील,के डी पाटील , प्रा.सुहास राऊत,निवास वातकर ,तानाजी पाटील , बी बी पाटील,सुरेश काटकर आदींची मनोगते झाली.
या प्रचार शुभारंभासाठी गोकुळ संचालक एस आर. पाटील, संचालक भगवान पाटील, आनंदा पाटील, माजी जि. प. सदस्य सजैराव पाटील, माजी सरपंच सदाशिव खाडे, विश्वास पाटील, दादासो लाड, कुंभी बॅक संचालक रंगराव पाटील, आदी उपस्थित होते. तसेच नरके पॅनलचे नूतन सर्व उमेदवार, आजी-माजी संचालक, कार्यकर्ते, शेतकरी ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार शुभारंभ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव जाधव हे होते. आभार प्रदर्शन माजी व्हा चेअरमन व कसबा बीडचे विद्यमान सरपंच उत्तमराव वरुटे यांनी केले.