शेतकऱयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचा निर्धार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-हुलगुंद रस्त्यासाठी पुन्हा शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जाणार आहेत. याबाबत वृत्तपत्रांतून नुकतेच नोटिफिकेशन देण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्मयातील दहाहून अधिक गावांच्या शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्या रस्त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमिनी देणार नाही, असा निर्धार शेतकऱयांनी केला असून जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन देण्यात आले आहे.
हैदराबादला जाण्यासाठी गुड्स कॉरिडोर या नावाने आणखी एक रस्ता करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हलगा-बस्तवाडपासून नेसरगी, हुनगुंद यामार्गे हा रस्ता करण्यासाठी नोटिफिकेशन देण्यात आले आहे. यामध्ये बस्तवाड, कमकारहट्टी, तारिहाळ, मरकट्टी, चंदनहोसूर, हन्नीकेरी, गणिकोप्प, नागनूर, सिद्धापूर यासह इतर गावांतील जमिनी घेतल्या जाणार आहेत. या सर्व जमिनी सुपीक असून त्या कोणत्याही परिस्थितीत आम्ही देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव-बेंगळूर रस्त्यासाठी यापूर्वी या परिसरातील शेतकऱयांच्या जमिनी घेण्यात आल्या. बागलकोट रस्त्यासाठीही जमिनी घेतल्या गेल्या आहेत. त्यानंतर आता हलगा-मच्छे बायपास व रिंगरोड करण्यासाठी नोटिफिकेशन तसेच जमिनी हिसकावून घेतल्या आहेत. नवीन रस्ते करण्याऐवजी जे रस्ते आहेत त्यांचे रुंदीकरण केल्यास शेतकऱयांच्या जमिनी वाचणार आहेत. रुंदीकरणाऐवजी जमिनी नव्याने घेऊन भूमिहीन बनविण्याचा घाट घातला आहे, असा आरोप शेतकऱयांनी केला आहे.
बेळगाव परिसरातील शेतकऱयांच्या जमिनी हिसकावण्याचा सपाटाच सुरू आहे. विकासाच्या नावाखाली हजारो एकर जमीन काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शेती देऊन वाचमन कामासाठी त्यांना जावे लागत आहे. याचा विचार करा, अन्यथा शेतकरी एक दिवस राजकीय व्यक्तींना हिसका दाखवतील, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.
वास्तविक या रस्त्याची काहीच गरज नाही. बागलकोट रस्ता रुंद असताना या रस्त्याची गरज काय? असा प्रश्नही शेतकऱयांनी उपस्थित केला आहे. एकूणच शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. असे होत असेल तर केंद्र सरकारलाच आता शेतकरी हिसका दाखवतील, असा इशारादेखील देण्यात आला आहे. सध्या हलगा-मच्छे बायपाससाठी जमिनी घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर कणबर्गी येथील शेतकऱयांची हजारो एकर जमीन बुडाने घेतली आहे. एकूणच विकासाच्या नावाखाली शेतकऱयांच्या जमिनी घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱयांनीच निवेदन स्वीकारावे
शेतकरी भर उन्हामध्ये निवेदन देण्यासाठी आले होते. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोके करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्याठिकाणी पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात थांबणार आहे, असे म्हणून आंदोलकांनी आत प्रवेश केला. यावेळी नेहमीप्रमाणे इतर अधिकारी निवेदन घेण्यासाठी आले होते. मात्र, आम्ही जिल्हाधिकाऱयांनाच निवेदन देणार असा आग्रह त्यांनी धरला. यावेळी बराच गोंधळ उडाला. शेवटी जिल्हाधिकारी नितेश पाटील स्वतः शेतकऱयांसमोर आले आणि त्यांनी निवेदन स्वीकारले. रयत संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नाईक, ऍड. रवी शास्त्राr यांच्यासह 10 गावांतील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.