पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील ईडा पिडा टळू दे, राज्यातील सर्व अरिष्ट दूर होऊ दे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपतीला घातले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी मानाचे आणि प्रमुख मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शिवसेना (शिंदे गट) संपर्क प्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख नाना भानगिरे, किरण साळी उपस्थित होते.
अधिक वाचा : हिंदू राष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक
निर्बंधमुक्त वातावरणामुळे सर्वत्र गणेशोत्सवात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यात धुमधडाक्यात हा उत्सव साजरा होत आहे. यांचे मला समाधान आहे, असे सांगतानाच ‘नियम पाळून उत्सवाला कुठेही गालबोट लागणार याची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी गणेशभक्तांना केले.