ऑनलाईन टीम / तरुण भारत :
2024 च्या निवडणुकीत बारामतीत भाजपचे कमळ फुलणार, असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केला आहे.
प्रल्हादसिंह पटेल यांनी आज सकाळी भोरमध्ये मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी आता बूथ पातळीवर तयारी केली आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत बारामतीतही भाजपचे कमळ फुलणार आहे. जेव्हा विरोधक जिंकतात, तेव्हा ते गप्प राहतात. जेव्हा हारतात तेव्हा ते ईव्हीएमचा मुद्दा काढतात. त्यामुळे विरोधकांच्या या मुद्याकडे फारसे लक्ष्य देण्याची गरज नाही. जलजीवन मशिनच्या माध्यमातून आम्ही देशातील 60 टक्के परिवाराला पाणी देण्याचे काम केले आहे. यापुढे आम्ही अशाच प्रकारे काम करू.
अधिक वाचा : राहुल गांधी देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासत आहेत
मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, उत्तराखंड आणि गुजरात या ठिकाणी आपण विजय मिळवलाच आहे. महाराष्ट्रातही विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप 5 राज्यच जिंकेल, या संजय राऊत यांच्या दाव्याला काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.