कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्हय़ात काही आठवडय़ांपूर्वी झालेल्या जळीत कांडातील पेट्रोल पुरविणाऱया सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. या जळीत कांडात एका घराला लावलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुस्लीमांमधील दोन गटांमध्ये ही दंगल झाल्याचे स्पष्ट झाले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. घरे जाळण्यासाठी पेट्रोल पुरविण्याची जबाबदारी दिलेल्या रितान शेख याला गुरुवारी अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फूटेजवरुन त्याला ओळखण्यात आले होते. त्याचे नाव या प्रकरणातील इतर संशयितांनी त्यांच्या चौकशीत उघड केले होते. सीबीआयच्या तडाख्यातून वाचण्यासाठी तो दिवसा लपून बसत असे आणि रात्री बाहेर पडत असे अशी माहिती तपास यंत्रणेने दिली.
गुरुवारी पहाटे त्याला त्याच्या बोगतुई येथील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्याशिवाय सीबीआय चौकशी आधी पोलिसांनी अटक पेलेल्या 22 जणांनाही आता सीबीआयने आपल्या कोठडीत घेतले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.