मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केल्यानंतर आज ते जालन्यात उपोषणासाठी बसले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला आश्वासन देऊन 40 दिवस पुर्ण झाले. पण त्यानंतरही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून मिळत नाही. त्यामुळे मी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आरक्षण न दिल्यास मरेपर्यंत संपावर राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे आहे. आज जालना येथील त्यांच्या उपोषण स्थळावर राज्यसभेचे माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनीही उपस्थित राहून पाठींबा दर्शविला.
काल दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या शपथेवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काल दसरा मेऴाव्यात शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवर आमचा विश्वास आहे. मात्र आता आम्ही मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना मनोज जरंगे म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदींना गरिबांची कळवळा आहे. पण आता मला काहीतरी अशी शंका येत आहे कि महाराष्ट्राच्या राजकारणात अंतर्गत काहीतरी शिजत आहे. नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी लागली नसती.
मनोज पुढे बोलताना म्हणाले कि, “पंतप्रधान मोदींनी फक्त एक फोन केला तरी आरक्षण मिळेल. मात्र, सध्या ते केवळ कागदावरच फिरत आहे. त्यांनीही शपथ घ्यावी आणि मीही शपथ घेतो. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना फोन केल्यावर आरक्षणाचा कागद लगेच तयार होईल. पण, सध्या त्यांना गरिबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.” असा टोलाही त्यांनी लगावला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी मनोज जरांगे- पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम आज संपला आहे.