राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील 1800 ते 2000 लोकसंख्या असलेल्या खिंडी व्हरवडे या गावातील नागरिकांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर एक ऐतिहासिक निर्ण घेतला आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकिय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी घालण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी आज पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे या गावातील लोकांनी विजयादशमी दिवशी अनोखा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत विविध राजकिय पक्षांच्या नेत्यांना गावात बंदी असेल. तसेच मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळत नाही तो पर्यत सर्व निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. सरपंच सपना राजकुमार पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.
दरम्यान, येत्या दोन दिवसात गावसभा घेऊन या संदर्भात ठराव करून तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना याचे निवेदन देण्यात असल्याची माहिती सरपंच सपना पाटील यांनी दिली, यावेळी उपसरपंच शशिकांत गुरव, डॉ, बाजीराव खांडेकर, प्रकाश पाटील, डी एम पाटील, गोकुळ पाटील, अर्जुन पाटील, राजाराम पाटील, प्रल्हाद पोवार, पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रा प सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते