प्रतिनिधी / कुडाळ
सद्गगुरू श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 जुन रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कोकणवासीय नामधारक, जीवनविद्या मिशन सिंधुदुर्ग शाखांमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक यांच्या भेटीसाठी प्रल्हाद पै येत असल्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सद्गुरू वामनराव पै यांचा जन्म २१ ऑक्टोम्बर १९२३ रोजी झाला असून हे त्यांचे जन्म शब्तादी वर्ष आहे याचे औचित्य साधून २१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत संपूर्ण देश आणि परदेशातही जीवनविद्या मिशनच्या विविध शाखाच्या माध्यमातून सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधनात्मक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या बाबतचे मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे.जीवनविद्या मिशन सात दशकांहून अधिक काळ विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रभोधनाचे कार्य करीत आहे. अखिल विश्वामध्ये वैचारिक क्रांती घडवून आणणे हे मुख्यध्येय असल्याने “ प्रत्येक कृती हि राष्ट्र हिताची, विश्व शांतीची” हे घोष वाक्य जनशब्तादी वर्षा निमित्त अधोरेखित करण्यात आलेले आहे. या पूर्वी जीवनविद्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करताना ग्रंथ दिडी पुस्तके, सिडी कोर्सेस, प्रवचने, व्याख्याने या माध्यमाचा प्रामुख्याने समावेश केला आहे. मात्र आज आधुनिक तंत्र ज्ञानाची कास धरून इंटरनेटच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार जगभर केला जात आहे.
सद्गुरूच्या १० व्या पुण्य स्मरणा निमित्त आयोजित कार्यक्रमात ” आनंद प्रसारण” या श्राव्य माध्यमाचे इंटरनेट रेडिओ चॅनेल निर्माण करण्यात आले आहे. या माध्यमातून जीवनविद्या तत्वज्ञान, मार्गदर्शन सातत्याने ३६५ दिवस २४ तास आणि ७ हि आठवडे उपलबध होणार आहे. मुख्यत्वे विद्यार्थी, तरुणाना बालसंस्कार केंद्रातील मुलांच्या सर्वागीण प्रगती साठी हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. व्यक्तीगत आणि व्यवसायिक जीवनात येणाऱ्या विविध आव्हाना सामोरे जाण्यासाठी प्रल्हाद पै कॉन्फरंस कॉल च्या माध्यमातून जगभरातील चाहत्याना नियमित मार्गदर्शन करीत आहे.कुडाळ येथील या मेळाव्यात प्रल्हाद पै जीवनविद्या मिशन चे हितचिन्तक याना प्रत्यक्ष भेटून जन्मशप्तदी वर्ष चा उपक्रम व जीवनविद्या मिशन चे आजचे सुरु असलेले कार्य या बद्दल सविस्तर मार्गदर्शन प्रल्हाद पै व जीवनविद्या मिशन चे विश्वस्त करणार आहेत. याचा लाभ नामधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा,असे आवाहन जीवनविद्या मिशन, कुडाळ शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.