प्रतिनिधी,विटा
Anil Babar News : अधिकारी चांगला असला तर विकासाच्या अडचणी येत नाहीत.लोकांच्यादृष्टीने डॉक्टर देवदूत असतो.त्यांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. योगायोगाने जिल्ह्याला सिव्हिल एक सर्जन आणि सज्जन डॉक्टर मिळाले आहेत.सर्जन सृजनशील झाले,तर जिल्ह्याचे आरोग्य चांगले राहील अस मत आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले.येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांचा सत्कार आमदार बाबर यांच्या हस्ते झाला.त्यावेळी ते बोलत होते.गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील,प्रकाश बागल,डॉ. विशाल कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर डी पाटील उपस्थित होते.
आमदार बाबर म्हणाले,डॉ. कदम हे खानापूर तालुक्यातील आहेत.त्यामुळे जिल्ह्याबरोबर खानापूर तालुक्यातील आरोग्य सेवा त्यांच्या हातून चांगली होईल. ग्रामीण भागातील आरोग्यसुविधा चांगल्या असल्यामुळे कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा मुकाबला करू शकली.प्रगत देशांच्या तुलनेत भारतात कोरोना लवकर नियंत्रणात येण्याचे कारण येथिल आरोग्य यंत्रणेने मानवता जपत केलेले काम आहे.लोकांच्यात मिसळून काम करणारे अधिकारी पाहिजेत.योगायोगाने जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दोन्ही माझ्या मतदारसंघातील आहेत.त्यामुळे आपले तालुके आरोग्याच्या दृष्टीने सक्षम होतील. शिक्षण,आरोग्य,शेतीला पाणी झाले तर भाग सुजलाम – सुफलाम होण्यास मदत होईल.वयाची साठ वर्षे सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते. पैसा, पदावर जीवन आनंदी होत नाही. तर लोकांच्या आर्शिवादावर होते. सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करा. शी अपेक्षा बाबर यांनी व्यक्त केली.
. डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, आरोग्याच्या बाबतीत खानापूर तालुका सक्षम करू.चांगल्या कामासाठी व रूग्णांच्या सेवेसाठी मी चोवीस तास तयार आहे.जिल्हा व खानापूर तालुक्यातील लोकांची सेवा करण्याची संधी आमदार बाबर यांनी दिली.या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करेन.आरोग्याच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले जाईल.विटा येथे लवकरच शंभर खाटाचे रूग्णालय आमदार बाबर यांच्या प्रयत्नातून होत आहे.लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. माझे कुटुंब शिक्षक पार्श्वभूमी असणारे आहे.ज्या भागात लहानाचा मोठा झालो, तेथिल संस्कारामुळे मोठा झालो.
डॉ. दिलीप माने म्हणाले,दबावतंत्र न आणता आमदार बाबर काम करून घेतात.जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे.चांगले काम करू.खानापूर तालुक्यात आरोग्याचे काम चांगले सुरू आहे.रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत.त्यामुळे मनुष्य बळ वाढेल.
गटविकास अधिकारी संताजी पाटील म्हणाले,ग्रामीण भागातील लोकांच्या कामासाठी शिक्षीत,उच्च शिक्षीत समाजापासून दूर होतात.डॉ.कदम यांनी स्वतःच्या मातीची नाळ तोडली नाही.डॉ.माने सूक्ष्म निरीक्षण करून त्यातून पर्याय काढतात.आमदार बाबर यांचा कामासाठी सतत पाठपुरावा असतो. डॉ. अविनाश लोखंडे,संतोष भिंगारदेवें,ऍड शौर्या पवार, डॉ सचिन गायकवाड,डॉ विशाल नलवडे,डॉ संताजी पाटील,डॉ दिलीप माने यांनी मनोगत व्यक्त केले.बाजार समिती संचालक फिरोज शेख,डॉ. विशाल नलवडे,डॉ. सारिका कुंभार,डॉ.अभिजीत जाधव,डॉ.देशचौगुले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.