300 बालकांना आध्यात्मिक मार्गदर्शन : गुऊकृपा वारकरी शिक्षण संस्थेचा उपक्रम
वार्ताहर /किणये
कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळी मृदंग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गांधीनगर, बेळगाव येथील गुऊकृपा वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 300 बालकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये मृदंग वादन, भजन, प्रवचन, कीर्तन आदींचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिर परिसरात विठूनामाचा गजर झाला. अनोखे मृदंग संमेलन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत वारकरी व बालक मृदंगावर थाप टाकताना दिसत होते.
मृदंगाच्या आवाजामुळे मंदिर परिसर बनला विठुमय
एकाच वेळेला इतक्मया प्रमाणात मृदंगाचा आवाज येत होता. या गजरामुळे सिद्धेश्वर मंदिर परिसर विठुमय बनला होता. या मृदंग संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मंडोळी येथील हभप माऊती पाटील महाराज हे होते. कै. हभप विष्णू कोंडुसकर महाराज यांनी बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांना, वारकऱ्यांना मृदंगाचे धडे दिलेले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ हे मृदंग संमेलन आयोजिले होते. चंदगड येथील अर्जुन दळवी महाराज यांनी विष्णू कोंडुसकर महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. गजानन पाटील महाराजानी उपक्रमाची माहिती दिली.
बालकांवर चांगले संस्कार करणे काळाची गरज
सध्याच्या आधुनिक काळात लहान मुले टीव्ही, मोबाईल व इंटरनेटशी अधिक जवळीक साधू लागली आहेत. याचा विपरीत परिणामही पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान बालकांवर चांगले संस्कार करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेच्यामार्फत मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या उद्देशाने त्यांना भजन व मृदंग यांचे धडे या ठिकाणी देण्यात आले आहेत, असे माऊती पाटील महाराज यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी रामभाऊ सकट महाराज, निवृत्ती मुचंडीकर महाराज, माऊती सांबरेकर महाराज, परशराम कनगुटकर महाराज आदींनी बालकांना मार्गदर्शन केले व आध्यात्माचे महत्त्व पटवून दिले. व्यासपीठावर श्रीकांत आनंदाचे, राजू कोंडुसकर, मोहन भोगुलकर, नागेश शहापूरकर, अभि महाराज आदी उपस्थित होते. आप्पाजी सुंठकर, ज्ञानेश्वर पाटील, मयूर हुंद्रे, चैतन्य कावळे, सुरज पाटील, ज्ञानेश्वर गणबोले, रामा पाटील, मधुसूदन आदींच्या हस्ते व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन राजू कावळे महाराज यांनी केले. मृदंग संमेलन पाहण्यासाठी महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात गर्दी केली होती.