मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते संजय राउत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हल्ला चढवताना केवळ एका विशिष्ट राजकीय पक्षाने शांतता भंग करण्यासाठी घेतलेल्या ठेक्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला फटका बसणार नाही असे म्हटले आहे.
रविवारी औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनाच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. “4 मे पासून आम्ही ऐकणार नाही. जर तुम्ही तुमच्या लाऊडस्पीकरने उपद्रव निर्माण करत राहिलात तर आम्ही मशिदींसमोर हनुमान चालीसाही दुप्पट आवाजात लाऊ असे राज ठाकरे म्हणाले होते.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, “1 मे रोजी मुंबईत भाजपची ‘बूस्टर डोस’ रॅली शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी आयोजित होती, तर भाजपची उपपत्नी असलेल्या मनसेने औरंगाबादमधील सभेत शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. मनसेवरील टीकेचे अधिक तपशीलवार वर्णन करताना राऊत म्हणाले की, “उपवस्त्र म्हणजे लोकांचा वापर करून काहीतरी घडवून आणणे होय. महाविकास आघाडीशी लढण्यासाठी काही लहान पक्षांचा राजकारणात भाजपकडून वापर केला जात आहे,अशीही टिका केली गेली आहे.