चिंदर गावातील बैल दगावेल्या शेतकऱ्यांना होणार पावरविडरची मदत
आचरा : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील चिंदर गावात वनस्पतीजन्य विषबाधेमुळे 45 जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या दुखाःच्या डोंगरात मदतीचे हात पुढे येत आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावतीने रोख रक्कम देण्यात आली होती. माजी खासदार डॉ . निलेश राणे यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. निलेश राणे यांनी बैल गमावलेल्या शेतकऱ्यांना नांगरणी करता यावी, शेतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये ,यासाठी पावरविडर स्वखर्चातून उपलब्ध करून चिंदर ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला आहे. याद्वारे गावातील ज्या शेतकऱ्यांचे बैल दगावलेत अशा शेतकऱ्यांना शेतीच्या कामात नांगरणीसाठी त्याचा उपयोग करता येणार आहे.
यावेळी, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रभारी सरपंच दिपक सुर्वे , जिल्हा बँक संचालक बाबा परब, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, भाजप नेते मंगेश गावकर, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, दिगंबर जाधव, सचिन घागरे, राजा पाटणकर, विश्राम माळगांवकर, रणजीत दत्तदास, समिर अपराज, बाबा पडवळ आदी उपस्थित होते.