राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी आता सुलभ करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह जवळच्या नोंदणी केंद्रात जाऊन नांव नोंदणी करावी असे महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यापूर्वी पात्र लाभार्थ्यांच्या मोबाइल नंबरला एसएमएस आल्यावर नोंदणी केंद्रांवर जावे लागत होते. आता एसएमएसवर अवलंबून न राहता थेट नोंदणी केंद्रांवर जाता येते.योजना सुरु झाल्यानंतर केवळ ७ दिवसात ५० लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी त्यांची नावे नोंदविले आहेत तसेच, गृहलक्ष्मी नोंदणीसाठी सेवा केंद्रांमध्ये कर्मचारी पैशाची मागणी करत असतील किंवा योजनेची अंमलबजावणी करण्यात त्रुटी दिसून आल्यास, संबंधित कर्मचाऱ्यावरफौजदारी खटला दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.