सरकारी भावापेक्षा बाजारभाव अधिक, खात्याला न परवडणारे
प्रतिनिधी /बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत रेशनकार्डधारकांना मासिक धान्यांचा पुरवठा केला जातो. सध्या केवळ तांदूळ वितरित केला जात आहे. जोंधळय़ाचा बाजारभाव अधिक असल्याने खात्याला जोंधळा खरेदी करणे परवडणारे नाही. त्यामुळे रेशनवर आता केवळ तांदूळच दिला जात आहे.
सरकारी भाव कमी असल्याने जोंधळा उत्पादक शेतकरी बाजारभावाने विक्री करीत आहेत. दरम्यान अन्न व नागरी पुरवठा खात्याला बाजारभावाप्रमाणे जोंधळा खरेदी करणे परवडणारे नाही. त्यामुळे रेशनमधून जोंधळा गायब झाला आहे. परजिल्हय़ात ज्वारी अधिक असली तरी वाहतूक खर्च वाढत असल्याने रेशनवर ज्वारी देणे बंद झाले आहे. जिल्हय़ात खरीप हंगामात 1.10 लाख हेक्टर क्षेत्रात तर रब्बी हंगामात 10 हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे उत्पादन होते. काही जिल्हय़ात ज्वारी पीक प्रमुख आहार आहे. केंद्रसरकारने ज्वारीला प्रति क्विंटल 2600 रुपये भाव निश्चित केला आहे. मात्र बाजारात 3500 ते 4000 प्रति क्विंटल ज्वारी विकली जात आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याला ज्वारी खरेदी करणे परवडणारे नाही.
ज्वारी देण्यासाठी प्रयत्न- श्रीशैल कंकणवाडी (उपनिर्देशक आहार खाते)
सरकारने ठरवून दिलेल्या भावाप्रमाणे जिल्हय़ात जोंधळा विकायला उत्पादक तयार नाहीत. त्यामुळे रेशनमध्ये जोंधळा देणे शक्मय नाही. मात्र सरकारतर्फे हमीभावाचा विचार करून रेशनवर ज्वारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हय़ातील एकूण कार्डधारकांची संख्या
कार्डधारक | एकूण लाभार्था संख्या |
रेशन दुकाने | 1394 |
अंत्योदय | 68926 |
बीपीएल | 10,75,810 |
एपीएल | 3,18,814 |
एकूण | 14,63,550 |