ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीवरुन निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने चिरडले. किवळे-देहूरोड परिसरात हा अपघात झाला. यात मायलेकीचा मृत्यू झाला. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून, बापलेकावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक नियंत्रित केली. सध्या या कुटुंबीयांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळी त्यांचे मोबाईल सापडले असून, त्यामार्फत त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात येत आहे.