ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिक चिघळला असतानाच आता राज्य सरकारसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. सोई-सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातमध्ये सामील करू, असा इशारा महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या नाशिकमधील 55 गावांनी राज्य सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील गावं सोई-सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील या आदिवासी बांधवांनी आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी नवी कलुप्ती शोधली आहे. सोई-सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातला जोडा अशी, मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
अधिक वाचा : दादा भुसेंना पालकमंत्रीपदावरून हटवा; भाजप नेत्याची फडणवीसांकडे मागणी
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पांगारगण गावात या 55 गावांमधील आदिवासी गावकऱ्यांची आज बैठक होत आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा हे गावकरी ठरवणार आहेत.