शेतकरी-भाजप पदाधिकाऱयांतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
गोवा-बेळगाव नव्याने होत असलेल्या महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबतचे दावे प्रलंबित आहेत. या दाव्यांची तातडीने सुनावणी होऊन नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शेतकरी व भाजपच्या पदाधिकाऱयांनी बेळगाव येथे दिले.
खानापूर तालुक्यात हलकर्णी, गणेबैल, खानापूर, करंबळ यासह अन्य गावांतील जमीन रस्त्याच्या कामासाठी अधिग्रहण करण्यात आली आहे. मात्र शेतकऱयांना मोबदला अद्याप मिळालेला नाही. करंबळ येथील काही शेतकऱयांना 7 लाख रुपये प्रती गुंठा, हलकर्णी येथील शेतकऱयांना 1 लाख 50 हजार प्रती गुंठा तर खानापूरच्या शेतकऱयांना 25 हजार प्रती गुंठा अशाप्रकारचा मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. या प्रकारच्या 290 तक्रारी जिल्हाधिकाऱयांकडे आहेत. याबाबत त्वरित सुनावणी करून शेतकऱयांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱयाकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी प्रत्येक आठवडय़ाला 75 दावे निकाली काढून लवकरात लवकर शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, विठ्ठल हलगेकर, किरण यळळूरकर, रवि गुरव, दत्ता घाडी, देसाई, गुंडू तोपिनकट्टी यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.