संपूर्ण देशाला गजवा-ए-हिंद (काफीरांशी युद्ध) इस्ला]िमक राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पीएफआय उराशी बाळगून होती. मात्र पीएफआयच्या मनसुब्याला तडे देण्याचे काम वेळीच एनआयएने करीत मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली. एनआयएचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या अतुलचंद्र कुलकर्णी यांनी संपूर्ण देशांतील कारवाईचे नेतृत्व करीत, पीएफआयसाठी अनोखी रणनीती आखत त्यांची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कठोर परिश्रम अणि अचूक तपासाअंती पॉप्युलर प्रंट ऑफ इंडीयाची (पेफआय) संपूर्ण पाळेमुळे खणून काढली आहेत. तर अनेक ठिकाणी पसरलेल्या पीएफआयच्या विषवल्ली कापण्यास सुरुवात केली आहे. जसे-जसे पेफआयच्या मुळाशी तपास गेला, तस-तसा यामागील छुपे चेहरे आणि छुप्पा उद्देश बाहेर येण्यास सुरुवात झाली. संपूर्ण देशांत गृहकलह निर्माण तयार करीत 2047 पर्यंत संपूर्ण इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा मनसुबा पीएफआयचा होता. यासाठी गजवा-ए-हिंद म्हणजेच काफिरांशी युद्ध पुकारीत देशाला मुस्लिम बहुल राष्ट्र करण्याचे कट-कारस्थान या पिलावळीने आखले होते. देश तसेच देशाबाहेरील अनेक मुस्लिम उद्योगपतींची आणि आखाती देशांत नोकरी करणाऱयांची मदत घेतली जात होती. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या मुस्लिमबहुल राष्ट्रासोबतच हिंदुस्थानलादेखील मुस्लिमबहुल राष्ट्र करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी पीएफआयने सुरु केली होती.
केवळ मुस्लिम तरूणच नाही तर अल्पसंख्याक तरुणांना आर्थिक आणि ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सामाजिक आणि मानसिक पाठबळ देत त्यांची माथी भडकाविण्याचे काम पीएफआयने सुरु केले होते. कराटे प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमामधून अर्थपुरवठा करीत पीएफआयचा प्रचार आणि प्रसार सुरु होता. मग तो हिजाब बंदी असो अथवा नुपुर शर्माचे वक्तव्य असो. हिजाब बंदीचे कारण पुढे करीत संपूर्ण देशांत पेफआयने मोठा हाहाकार माजविण्यास सुरुवात केली होती. यामध्ये शाळा-महाविद्यालयीन तरूण-तरूणीनादेखील त्यांनी सोडले नाही. त्यांच्या माध्यमातून भारत सरकार मुस्लिमांवर कशाप्रकारे अन्याय करते आहे, हे जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न पीएफआयने सुरु केला. तर याला हिंसक वळण कसे लागेल यासाठी पीएफआयचा घातकी विभाग कामाला लागला. अनेक ठिकाणी जाळ-पोळ, हिंसक वातावरण तयार केले. हे कमी की काय म्हणून नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद मिटत असतानाच पेफआयने याला खतपाणी घालत पुन्हा हा वाद उकरुन काढला. ठिकठिकाणी त्यांनी हत्यासत्र सुरु केले. राज्यातील उमेश कोल्हे हत्याप्रकरण असो अथवा राजस्थानमधील हत्या प्रकरण असो.
मात्र हे सर्व घडत असताना पीएफआयच्या संपूर्ण कारभार आणि त्यांच्या घातकी मनसुब्यावर लक्ष होते ते एनआयएचे. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी पेफआयवर सातत्याने लक्ष ठेवल्याने, अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा होण्यास सुरुवात झाल्याने, हे देशासाठी घातक ठरु शकते. याची त्यांना कल्पना आली होती. यावेळी त्यांनी तत्काळ सर्व पुरावे गोळा करीत, एनआयएच्या इतर अधिकाऱयासह देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची तत्काळ भेट घेतली. पीएफआय ही देशाला आतून खोकला करीत असून, लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, याची खात्री त्यांनी करुन दिली. पीएफआय म्हणजेच सिमीचे (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडीया) दुसरे रुप आहे. सिमीचे जाळे ज्याप्रमाणे ग्रामीण भागापर्यंत पोहचले होते. अगदी त्याचप्रमाणे पीएफआय ही शहरी तसेच ग्रामीण भागापर्यंत पोहचली होती. सिमीचे अनेक कार्यकर्ते तसेच माजी अध्यक्ष हे पीएफआयचे जन्मदाते आणि अध्यक्ष असल्याचे सर्व पुरावे अतुलचंद्र कुलकर्णी यांनी अमित शहा यांना दिले. यावेळी तसूभरही वेळ न दवडता शहा यांनी तत्काळ पीएफआयवरील कारवाईला हिरवा कंदील दिला.
त्यानुसार, एनआयएने कन्याकुमारीपासून ते श्रीनगरपर्यंत तसेच राजस्थानपासून ते आसामपर्यंत पीएफआयवरील कारवाईला सुरुवात केली. सिमी संघटनेत सक्रीय असलेला ओ.एम.ए.सलाम हा पीएफआयचा अध्यक्ष होता. त्यानेच 2006 साली पीएफआयला जन्माला घातले. तर कोचीन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी विद्यापिठात ग्रंथपालाची नोकरी करीत असलेला तसेच सिमीचा माजी अध्यक्ष असलेला ई.एम. अब्दुल रहमान हा देखील पीएफआयच्या स्थापनेपासून बरोबर असल्याचे समोर आले. तसेच कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये सॉफ्टवेअर कंपनी चालविणारा अब्दुल वाहिद सईद हा पीएफआयचा राष्ट्रीय परिषदेचा सदस्य आहे. तर बंगळुरुच्या एरिक्सन कंपनीत ग्लोबल टेक्निकल मॅनेजर असलेला अनिस अहमद हा पीएफआयचा राष्ट्रीय महासचिव आहे. केरळ सिमीचा अध्यक्ष राहिलेला अबु बकर हा देखील पेफआयच्या स्थापनेपासून बरोबर आहे. केरळमध्ये थेजस नावाची पत्रिका निघते, तिचा हा संपादक आहे. या सर्वांची कुंडली कुलकर्णी यांना प्राप्त होताच, त्यांनी तत्काळ कारवाईला वेग दिला. यामध्ये अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. गेल्या सोळा वर्षापासून स्लो पॉयझEिनगचा वापर करीत पीएफआयने देशातील अनेक राज्यात हात-पाय पसरविले आहेत. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून तसेच अनेक मदरशांच्या माध्यमातून त्यांनी पीएफआयसाठी भडक माथी तयार करण्यास सुरुवात केली होती.
नंदुरबार जिह्यातील अक्कलकुवा गावात जमिया इश्शातुल्ला उलम हा मदरशा आहे. या मदरशामध्ये देशातूनच नाही तर परदेशातून देखिल विद्यार्थी येत असतात. या गावात आणि मदरशामध्ये तेथील स्थानिक पोलिसांनादेखील एण्ट्री नाही. अशा मदरशामधूनच पीएफआयची सुत्रे सुरु आहेत. तर या मदरशाची पाळेमुळे संपूर्ण देशांत विस्तारलेली आहेत. मदरशाच्या माध्यमातूनच पीएफआयने त्यांची विषवल्ली पसरवली आहे. पीएफआयच्या संपर्कात केवळ मुस्लिम उद्योगपतीच नाही तर अनेक राजकारणीदेखील असल्याचे समोर आले आहे. या राजकारण्याच्या मदतीने पीएफआयने काही ईप्सीत साध्य केले आहे. पीएफआयच्या पगारावर काही समाजकंटकांचा उदरनिर्वाह सुरु असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे झाकीर नाईकनेदेखील पीएफआयशी संधान साधून परदेशी फंड गोळा करण्याचे काम सुरु केले होते. पीएफआयच्या पगडय़ाखाली अनेक सामाजिक संस्था तर आहेतच मात्र अनेक सरकारी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावरदेखील पीएफआयचा पगडा आहे. तो वेळीच दूर करुन पीएफआयचे समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा 2047 दूर नाही.
– अमोल राऊत