प्रतिनिधी /बेळगाव
येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयात कामगार दिन साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वर्णीम भारत कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश कित्तूर, एच. बी. पाटील, महेश कुलाली आदी उपस्थित होते. अनगोळ शाखेच्या संचालिका राजयोगिनी बी. के. विद्या यांनी दैनंदिन जीवनात कामगारांचे महत्त्व विशद केले. प्रत्येक माणूस कर्मयोगी आहे. कौशल्याने त्याने काम करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
बी. के. मीनाक्षी म्हणाल्या, आध्यात्मिक ज्ञानाला अंत नाही. वर्तमानात जगताना प्रत्येकांसाठी आध्यात्म महत्त्वाचे आहे व ते तितकेच गरजेचे आहे.
धीर न सोडता कर्म करा
कामगारांनी धीर न सोडता कर्म करावे, असे आवाहन त्यांनी केले. बी. के. सुधा यांनी संस्थेचा परिचय करून दिला. बी. के. दत्तात्रय यांनी स्वागत केले. बी. के. सुरेश पत्तार यांनी आभार मानले.