आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी : सायंकाळी 4 वाजताच पसरला अंधार
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठ-दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा हजेरी लावली. शाळा सुटण्यावेळी पाऊस आल्याने अनेक विद्यार्थ्यांना भिजतच घर गाठावे लागले. जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. जोरदार वारा आल्यामुळे सुरक्षित ठिकाणी अनेकांनी धाव घेतली. हा पाऊस मशागतीसाठी पोषक ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाऱयासह पडलेल्या पावसामध्ये अनेक झाडे कोसळली आहेत. झाड कोसळून एकाचा जीवदेखील गेला आहे. त्यामुळे भीतीने अनेकांनी सुरक्षित ठिकाण शोधून पाऊस जाण्याची वाट पाहिली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काही भागामध्ये पावसाचा शिडकावा झाला. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले.
शहरासह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पाऊस आणि वाऱयामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून वळिवाच्या पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले आहे. मध्यंतरी आलेल्या वादळामुळे काहीसा पावसाचा शिडकावा झाला होता. आता पुन्हा वळिवाने सुरुवात केल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱयांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगामी खरीप हंगामाच्या मशागतीसाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.
नागरिकांची उडाली तारांबळ
पावसापेक्षाही वाऱयालाच अधिक जोर असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी झाडे, विद्युतखांब कोसळून नुकसान झाले आहे. मागीलवेळी आलेल्या पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ झाड कोसळून 20 हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले होते. याचबरोबर काही ठिकाणी विद्युतखांब कोसळून हेस्कॉमचेही मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले नसले तरी वारा आणि पाऊस यामुळे अनेकांना आडोसा शोधावा लागला. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. फेरीवाले, भाजीविपेत्यांसह इतर व्यापाऱयांनाही याचा फटका बसला. सखल भागामध्ये पाणी साचून होते. त्यामधून वाट काढताना नागरिकांची चांगलीच दमछाक उडत होती.
मशागतीच्या कामांना वेग येणार
ग्रामीण भागातही मंगळवारी पाऊस झाला. सध्या मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. त्यामुळे तालुक्मयातील दक्षिण भागामध्ये हा पाऊस पोषक ठरणार आहे. कारण पावसाअभावी या परिसरातील मशागतीची कामे खोळंबली होती. आता कामांना गती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.