डॉ. बालसिंग रजपूत यांनी केले मार्गदर्शन
बेळगाव : सायबर गुन्हेगारी वाढली आहे. इंटरनेच्या माध्यमातून आर्थिक गुन्हेगारी केली जात आहे. ऑनलाईन जुगार, महिला संबंधीचे सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येकांनी जागरुकता बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन मुंबई पोलीस दलातील सायबर क्राईम विभागाचे उपायुक्त डॉ. बालसिंग रजपूत यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सायबर गुन्हेगारी व पोलीस तपास या विषयावरील राष्ट्रीय वेबीनारमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी वरील आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. आर. एन. मनगोळी उपस्थित होते. विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. रामचंद्रगौडा यांनीही आधुनिक जगात विधीविज्ञानाची गरज या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. आर. एन. मनगोळी म्हणाले, सायबर गुन्हेगारी विषयी राबविले जाणारे जनजागृतीचे अभियान गुन्हेगारी रोखण्यासाठी मदतीचे ठरणार आहे. डॉ. नंदिनी देवरमनी म्हणाल्या, सायबर गुन्हेगारी विषयी समाजात व्यापक जागृती करण्याची गरज आहे. यावेळी चंद्रशेखर एस. व्ही., डॉ. महेश्वरी काचापूर व विद्यार्थी उपस्थित होते.