मणिपुरमध्ये भाजपची सत्ता असूनही गेले दोन महिने पेटत राहीले आहे. मणिपूर संदर्भात सूचना देऊनीही त्यावर कोणतीच ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टिचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच तसेच पाटण्यात भाजप विरोधी पक्ष एकत्र आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैराश्येतून आपल्यावर टिका केली असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
मुंबईती माध्य़मांशी बोलाताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला, ते म्हणाले “राज्यात अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. गोव्यात, महाराष्ट्रात आमदार फोडून भाजपने सत्ता स्थापन केली आहे. केवळ काही राज्यापुरतीच भाजपची सत्ता आहे. भाजपची सत्ता असूनही मणिपुर 45 दिवस पेटले आहे. पंतप्रधानांनी निवडणूकीच्या तोंडावर समान नागरी कायद्यासंदर्भात वक्तव्य करणे हे अशोभनिय आहे.” असेही मत त्यांनी मांडले.
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधानांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर भाष्य केले. ते म्हणाले, “मी कोणत्याच शिखर बॅंकेचा सभासद नाही. महाराष्ट्रातील शिखर बॅंकेच्या चौकशीत राष्ट्रवादीबरोबर भाजपच्या लोकांचीही चौकशी झाली.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “पाटण्यात सर्व भाजप विरोधक एकत्र आल्याने पंतप्रधानांची अस्वस्थता वाढली आहे. त्या अस्वस्थेतूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्तव्य करत आहेत.” विरोधी पक्षांची दुसरी बैठक 13 आणि 14 जुलैला बेंगळूरमध्ये होणार असल्याची माहीतीही शरद पवारांनी माध्यमांना दिली आहे.