पलूस प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असताना त्याचेच पडसाद बुधवारी पलूस येथे उमटले. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या व्यक्तव्याचा पलूस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. राज्यपालांनी केलेले विधान मागे घेऊन महाराष्ट्रातील जनेतीची माफी मागावी. एक नव्हे तर तीनदा चुकीच्या पध्दतीने वक्तव्य करण्यात आले आहेत. याची केंद्रसरकारने गांभियनि दखल घेवून बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाची बदली करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.