फोंडा : वारखंडे-फोंडा येथील सुहासिनी विठ्ठल नाईक यांच्या ‘उखाण्याच्या व म्हणीच्या सानिध्यात’ या पुस्तकाचे कृषी मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यापुर्वी त्यांच्या ‘धालांच्या मांडावर’ व ‘ओव्याच्या प्रांगणात’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सुहासिनी व विठ्ठल नाईक यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा त्याच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला. यावेळी फोंडयाचे नगराध्यक्ष रितेश नाईक, विद्या वृद्धी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष उदय डांगी, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेश गावणेकर, विद्या वृद्धी स्कूलच्या मुख्याध्यापिका रूक्मी डांगी, भारतीय स्टेट बॅकचे माजी अधिकारी प्रकाश बाळवे व विठ्ठल नाईक हे उपस्थित होते. मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते समई प्रज्ज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलताना रवी नाईक यांनी त्यांना लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उखाणे व म्हणींचे पुस्तक लिहून पुढील पिढीला दिल्याबद्दल सुहासिनी नाईक यांचे अभिनंदन केले. आपली परंपरा व सांस्कृतिक ठेवा जपणे आवश्यक आहे. आजच्या महिलांनी त्याचे जतन करावे. लोककला व इतर सांस्कृतिक परंपरा सुरू ठेवाव्या असे आवाहन केले. उदय डांगी, नरेश गावणेकर यांनी लोकसंस्कृतीचे जतन करणारे पुस्तक लिहल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुहासिनी नाईक म्हणाल्या म्हणी म्हणजे ज्ञान त्यांचे आजच्या पिढीला आकलन होणे गरजेचे आहे. त्यांना या शब्द भांडार व वाचनांची आवड व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे. ऐकीव व स्वरचित उखाण्याचा यात समावेश करण्यात आला आहे. ते महिलांना नक्कीच उपयोगी पडेल. या कार्यासाठी मला पती, मुलगे, सुना व हितचिंतकानी प्रोत्साहन दिले असे त्यांनी सांगितले. स्वागत राजू नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदेश नाईक यांनी केले.
Previous Articleवेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.