जिह्यातील 900 दुकानदारांना परवानगी : नागरिकांना परिसरातच सुविधा : विविध दाखल्यांसह बिले भरणे, आयुष्यमान भारत विमा योजना, आभा कार्ड, मोबाईल रिचार्ज आदी सुविधा
कोल्हापूर/ प्रवीण देसाई
रेशन दुकानांमधून आता रेशनवरील धान्याबरोबरच ‘आपले सेवा केंद्र’मधून विविध दाखल्यांसह वीज बिल, पाणी बिल भरणे, मोबाईल रिचार्ज, आयुष्यमान भारत विमा योजनेसह अनेक सुविधा मिळत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिह्यात सुमारे 900 रेशन दुकानदारांना या केंद्रांची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानदारांना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळाला आहे. त्याचबरोबर ग्राहकांनाही आपल्याच परिसरात या सुविधा मिळत आहेत.
रेशन दुकानांमधून गहू, तांदूळ याचे वितरण होत असल्याचे चित्र आतापर्यंत पहायला मिळत होते. परंतु आता सरकारने रेशन दुकानदारांना नागरिकांना अन्य सुविधाही पुरविण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे रेशन दुकानांमध्येच ‘आपले सेवा केंद्र’ सुऊ झाली आहेत. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने जिह्यातील सुमारे 1650 रेशन दुकानदारांपैकी 900 जणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना रेशनवरील धान्याबरोबरच ‘आपले सेवा केंद्रा’तून उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला, रहिवाशी दाखला, सातबारा, विज बिल, पाणी बिल, मोबाईल रिचार्ज, आभा कार्ड, आयुष्यमान भारत विमा योजना, पोस्ट विमा योजना आदी सुविधा मिळत आहेत. ग्राहकांना त्यांच्याच परिसरात सहजच या सुविधा मिळत आहेत. फक्त गहू व तांदूळ विकून कुटूंबाचा डोलारा सांभाळताना दुकानदारांची ओढाताण व्हायची. परंतु आता ‘आपले सरकार केंद्र’ या माध्यमातून दुकानदारांना उत्पन्नाचा नवीन स्त्राsत मिळाला आहे. यामुळे रेशन दुकानदारांना आणखी थोडा आर्थिक हातभार लागल्याचे चित्र आहे.
दुकानदारांना उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत
सरकारने रेशन दुकानांमध्येच ‘आपले सरकार केंद्र’ सुऊ करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिह्यातील 1650 रेशन दुकानदारांपैकी आतापर्यंत 900 जणांनी हे केंद्र सुऊ केले आहे. या माध्यमातून ग्राहकांना विविध सेवा दिल्या जात आहेत. सरकारने रेशन दुकानदारांना उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध कऊन दिला आहे. या माध्यमातून सरकारने चांगले पाऊल उचलल्याबद्दल दुकानदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
-रविंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर रेशन दुकानदार संघटना