प्रतिनिधी/रत्नागिरी
शहरातील पंधरामाड मिऱ्या येथे समुद्राला उधाण आल्याने लगतच्या रहिवासी परिसरात पाणी आले आहे. पौर्णिमेनंतर समुद्राने रौद्र रूप धारण केले आह़े. त्यात जोराच्या वाऱ्यामुळे उंच लाटा किनारी भागावर आदळत आहेत़ यामुळे या वस्तीच्या ठिकाणच्या घरांना धोका निर्माण झाला आह़े. याठिकाणी असलेल्या धूपपतिबंधक किनाऱ्यावर करोडो रूपये आतापर्यंत खर्ची पडले आहेत़ असे असताना देखील खवळलेल्या समुद्राचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत आह़े.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्हृयात अतिवृष्टी होत आह़े सर्वत्र अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत़ दरम्यान 14 जुलै नंतर पावसासोबतच सोसाट्याचा वारा देखील सुटला आह़े. त्यामुळे समुद्राला उधाण आले आह़े याचा फटका दरवर्षी प्रमाणे पंधरामाड मिऱ्या, जाकीमिऱ्या, अलावा याठिकाणी राहणाऱ्या लोकांना बसत आह़े. पंधरामाड याठिकाणी शासनाकडून धूपपतिबंधक बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आल़ा. यासाठी कोट्यावधींचा निधी खर्ची करण्यात येत आह़े. मात्र अद्याप याचा दिलासा स्थानिक रहिवाशांना झाला नसल्याचे दिसून येत आह़े. मागील वर्षी पावसाळ्यात पंधरामाड मिरऱ्या येथील धूपपतिबंधक बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले होत़े त्याचपमाणे बंधाऱ्यावर रस्ता वाहून गेला होत़ा तसेच रेतीचा काही भाग वाहून जात समुद्राचा किनारपट्टी भागात घुसू लागल्याने रहिवाशांच्या मागणीनुसार याठिकाणी तात्पुरती डागडूगी प्रशासनाकडून करण्यात आली होत़ी आता मागील दोन दिवसांपासून समुद्राला आलेल्या उधाणामुळे पुन्हा एकदा मिऱ्याला समुद्राचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आह़े.
सुरूवातीला सुमारे 94 कोटी रूपये चे काम मिऱ्या बंधाऱ्यासाठी निश्चित करण्यात आले होत़े दरम्यान निधी उपलब्ध होवू शकला नसल्याने केवळ मलमपट्टी याठिकाणी करण्यात आल़ी आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी 190 कोटी रूपयांचा प्लॉन तयार करण्यात आला आह़े एकूण साडे तीन किलोमीटर बंधाऱ्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आह़े. सध्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा मिऱ्या वासियांकडून करण्यात येत आह़े.