संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे मागणी महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणाऱया व्यक्तीची निवड करावी
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद साऱया राज्यभर उमठत आहेत. माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटविण्याची मागणी राष्ट्रपती दौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, ती व्यक्ती महाराष्ट्रातील असावी, अशी मागणी करणारे ट्व्टि केले आहे.
संभाजीराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. ट्व्टिमध्ये त्यांनी म्हटले आहे की ः विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. छत्रपती शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबईसंदर्भातील वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.