सावंतवाडी / प्रतिनिधी
Retirement age limit of 60 years is injustice to the educated unemployed – former mayor Baban Salgaonkar
निवृत्तीची वयोमर्यामर्यादा 60 वर्ष करून शासनाने सुशिक्षित बेकार तरुणांवरती अन्याय केला आहे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.अशी मागणी .. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र असून सुशिक्षित बेकारांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे शासकीय सेवेमध्ये रिटायरमेंट ची मर्यादा साठ वर्षे केल्यामुळे हा निर्णय तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवणार आहे एक तर वय वाढल्यानंतर बेकार तरुणांना डी-बार करण्यात येतं. नंतर त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात येत नाही यामुळे तरुणांची वय वाढत जाऊन तरुण कायमस्वरूपी नोकऱ्यांपासून वंचित राहील ही समस्या प्रकर्षाने जाणवते याही समस्येचा शासनाने गांभीर्याने विचार करावा तसेच सुशिक्षित बेकार तरुणाने या निर्णयाचा तीव्र निषेध करून शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे शासनाने या निर्णयाचा फिर विचार करावा साठ वर्षे मर्यादा केली तो निर्णय मागे घ्यावा कळकळीची विनंती बबन साळगावकर यांनी केले आहे.